बहादूरवाडी किल्ला
इतिहास:-
बहादुरवाडी किल्ला माधवराव पेशव्यांनी बांधला. नंतर तो पटवर्धनांच्या ताब्यात देऊन कोल्हापूरकरांवर वचक बसवण्यासाठी याचा उपयोग केला गेला. नंतर बहादूरवाडी ची देशमुखी नक्की कुणाची यावर बरेच वाद पुढील काळात झाले. माने, शिंदे, घोरपडे ही तीन घराणी बहादूरवाडी च्या देशमुखी करीता वाद करत होती.१७३६ मध्ये रायाजी व हेगोजी माने यांच्या वाळवा वतनासाठी वाद झाला त्यात शाहू महाराजांनी वाळव्याची विभागणी करून बहादूरवाडी हे वतन हेगोजी मान्याकडे दिले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तर .ब्रिटीशकालीन गॅझेटियरच्या मताप्रमाणे हा भुईकोट माधवराव पेशव्यांनी कोल्हापुरकर भोसलेंच्या आक्रमणापासुन सातारा गादी व कोल्हापुर गादी यांच्या सीमेवर म्हणजे वारणा नदीकाठी संरक्षणासाठी बांधला आणि तो मिरजकर पटवर्धनांच्या ताब्यात दिला.
काय पहाल
या कोटाची बांधणी खणखणीत आहे. तटबंदीच्या बाहेर खंदक खोदलेला आहे. कोटाला चार तटबंद्या आहेत. खंदकाला जोडून असलेल्या तटबंदीला १२ बुरुज आहेत. त्याआतील दुसरी तटबंदी पाच मीटर आहे. ती गोलाकार असून, त्याला आठ बुरुज आहेत. अशा एकात एक चार तटबंद्या असून, चौथी मात्र आयताकृती आहे.किल्ल्यामध्ये एक विहीर आणि वाडय़ाचे काही अवशेष आहेत. कोटालगत वेतोबाचे छोटेखानी मंदिर आहे.भुईकोट किल्ला असलेने गड साधारण १ तासात पाहुन होतो.गावात विचारणा केली असता या गडाबद्दल लोकाना इतिहास सांगता येत नाही.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
Tags
गडकिल्ले
