“हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : असा संदेश चित्रपटाच्या सुरुवातीला का असतो ?

 “हा चित्रपट  काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : असा संदेश चित्रपटाच्या सुरुवातीला का असतो ?  

____________________________________

.        http://bit.ly/3Gicz3a

तुम्ही ज्यावेळी चित्रपट पाहायला सुरुवात करता त्यावेळी पाच सहा सेंकदाची एक पाटी दिसते

“हा चित्रपट  काल्पनिक घटनांवर आधारित आहे” : असा संदेश चित्रपटाच्या सुरुवातीला का असतो ?

ज्यामध्ये लिहिलेले असते की,  "हा चित्रपट काल्पनिक घटनांवर आधारित आहे आणि त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा."
पण कधी विचार केलाय का प्रत्येक चित्रपटामध्ये सुरुवातील ही सूचना का दिली जाते? त्यामागे कारण काय आहे? चला जाणून घेऊया.
रसपुतीन, हे नाव जगभरातील राजकीय लोकांच्या ओठी असते पण त्याच्या स्तुतीसाठी नाही, तर त्याने केलेल्या वाईट गोष्टींसाठी! रशियाच्या शाही कुटुंबासाठी सल्लागार म्हणून कामकाज पाहणाऱ्या रसपुतीनचा जन्म १८६९ मध्ये झाला होता. काही लोकांचा दावा आहे की त्याला संमोहनाची कला अवगत होती आणि त्याच जोरावर त्याने शाही कुटुंबाला आपल्या वश मध्ये केले होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, खरा खेळ तेव्हा सुरु झाला जेव्हा तो अध्यात्मिक गुरु बनला. रसपुतीनने स्वत:ला साधू म्हणून घोषित केले आणि तो कोणाचेही ऐकुनासे झाला. त्याला लोक वेडा भिक्षु म्हणत असतं. काही काळानंतर त्याला वेडा म्हणून हिणवणारे हेच लोक त्याच्यावर देवासारखा विश्वास ठेवू लागले, कारण तो जी भविष्यवाणी करत असे ती खरी होत असे. ही बातमी रशियाची राणी एलेक्जेंड्रा पर्यंत पोहोचली. राणीच्या मुलाची तब्येत एका रोगामुळे खूप खराब झाली होती आणि रसपुतीनने त्याला त्या रोगातून पूर्णपणे बरे केले. मग काय, संपूर्ण शाही कुटुंबातील लोक त्याला मानू लागले. सर्वांना तो आवडू लागला, परंतु रसपुतीन बाहेरून जेवढा साधा वाटत होता, तसा तो बिलकुल नव्हता. नेहमी तो शारीरिक सुखासाठी हपापलेला असायचा. असे म्हटले जाते की, त्याने आपल्या संमोहन शक्तीचा वापर करून राणी एलेक्जेंड्राशी सुद्धा त्याने शारीरिक संबंध ठेवले होते.पण त्याच्या मार्गदर्शनाने राज्यकारभार करून सुद्धा रशिया प्रत्येक युद्धात पराभूत होत होता. अखेर शाही कुटुंबाकडूच त्याची हत्या केली गेली.
📽आता तुम्ही विचार करत असाल की, या गोष्टीचा आणि चित्रपटामध्ये सुरुवातीला देण्यात येणाऱ्या सुचनेचा काय संबंध आहे?
तर – रसपुतीनच्या जीवनातील उलथापालथेने प्रेरित होऊन त्याच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची योजना MGM प्रोडक्शनतर्फे आखण्यात आली. चित्रपट बनवला गेला आणि तो १९३३ मध्ये प्रदर्शित झाला. पण या चित्रपटातून बदनामी होत असल्याचा दावा करून रशियाची तत्कालीन राणी आयरिन हिने चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात केस ठोकली.
चित्रपटामध्ये रसपुतीन हा राणी आयरीन हिच्यावर बलात्कार करत असल्याचा प्रसंग दाखवण्यात आला होता. याच प्रसंगावर राणी आयरीन हिने हरकत वर्तवली घेतली आणि चित्रपटाविरोधात कायद्याने दाद मागितली.
कोर्टाने देखील केस मान्य करून आपल निकाल दिला आणि बदनामी केल्याच्या आरोपांखाली MGM प्रोडक्शन हाउसला रग्गड दंड ठोठावला, तसेच चित्रपटावर देखील बंदी घालण्यात आली.
या घटनेतून जगभरातील सर्वच फिल्म इंडस्ट्रीने चांगलीच शिकवण घेतली आणि प्रत्येक चित्रपटाच्या पूर्वी तो चित्रपट कल्पनिक असल्याची सूचना दाखवण्यात येऊ लागली, जेणेकरून कोणत्याही प्रकारे व्यावसायिक हानी होऊ नये.
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম