शेत रस्ता नसलेस अर्ज कसा करावा

🅰️ शेत रस्ता नसलेस अर्ज कसा करावा 🅰️
--------------------------------------
माहीती सेवा ग्रूप पेठवडगाव
--------------------------------------
स्वत:च्या शेतात ये-जा करणेसाठी रस्ता असतो.पण बरयाचवेळा शेजारील शेतकरी वाट बंद करतो.कधीकधी अटकाव करतो.यामुळे बरयाच वेळा वाद विवाद होतात.भांडणे होतात.काही गावात या कारणवरून खुनाचे देखिल प्रकार घडले आहेत.शक्यतो असे वाद सामोपचाराने मिटवावेत.ते शक्य नसेल तर सरकार दरबारी अर्ज करून न्याय मागावा.नवीन शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात, अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय असते याची माहिती पाहणार आहोत.
✍️ अर्ज कसा करायचा?
शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम १४३ अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.
यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो. 
✍️ अर्जाचा नमुना
प्रति,
मा तहसिलदार साहेब,
गावाचे नाव (तालुक्याचं नाव)
अर्ज - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे.
विषय - शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत.
अर्जदाराच्या जमिनीचा तपशील -
नाव - ×××× ता.××××जि.××××
गट क्रमांक - ×××, क्षेत्र - ××× हे.आर., आकारणी - ××× रुपये (कराची रक्कम)
लगतच्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता -××××
{इथं अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन असते त्यांची नावं आणि पत्ता लिहिणं अपेक्षित असतं.}
त्यानंतर मायनामध्ये तुम्ही असं लिहू शकता...
मी ×××× ×××× येथील कायम रहिवासी आहे. ×××× येथील गट क्रमांक --- मध्ये माझ्या मालकीची --- हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरबरा, घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
तरी मौजे ××××, ता. ×××× येथील गट क्रमांक --- मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे.
आपला विश्वासू,
×××××
________________________
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडावीत.
1. अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा
2. अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षांतील (तीन महिन्याच्या आतील) सातबारा
3. लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील
4. अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,एकदा का शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते.तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय, याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते.
ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात, आदेश पारित करतात.
एक तर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात. अर्ज मान्य केल्यास लगतच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल, असं पाहिलं जातं.
सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल, इतका रस्ता दिला जातो.
पण, तहसीलदारांचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजे दोन महिन्यांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा करता येतो.
तरी शेतकरयानी हा वाद शक्यतो आपपसात मिटवावा.व पैसा व वेळ वाचवावा.आवश्यक असेल तरच सरकार दरबारी पायरी चढावी.
-माहिती सेवा ग्रुप, पेठवडगाव
_________________________
थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম