🅰️ वाळणकोंडीची देवी वरदायनी आणि रहस्यमय देवमासे🅰️
_______________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_______________________
फेसबुक लिंक https://bit.ly/339sBe2
🐋महाड बिरवाडीपासून 25 कि.मी.च्या अंतरावर असलेले वाळण हे ठिकाण रायगडच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे; परंतु आडमार्गाला असल्यामुळे ते दुर्लक्षित राहिले आहे. या ठिकाणी नदीपात्रातील खडकांमध्ये वरदायनी देवीचे जागृत देवस्थान असून येथे सात आसरा असल्याचे संबोधले जाते. नदीपात्रात असलेले वरदायनी देवी मातेचे मंदिर पाहण्यास मिळते.
नोंद नाही. हिवाळयात आणि उन्हाळयातच हे मासे येथे दिसतात आणि पर्यटकांनी आणि देवीच्या भक्तांनी दिलेल्या लाह्या, तांदूळ आणि इतर प्रसाद खातात. आश्चर्याची आणखी एक गोष्ट अशी आहे की, हे मासे श्रीफळ-नारळदेखील खातात. पर्यटकांनी फोडून खाऊ घातलेले श्रीफळाचे - खोबऱ्याचे तुकडे खाण्यासाठी देवमासे तुटून पडतात, पण ते फक्त हिवाळयात आणि उन्हाळयातच. पावसाळयाच्या सुरुवातीसच हे देवमासे येथून गायब होतात. पावसाच्या संपूर्ण कालखंडात देवमासे कुठे जातात याबद्दल कोणालाच काही ठाऊक नसते; पण एकदा पावसाळा संपला की देवमासे कुंडामध्ये पुन्हा मोठया प्रमाणात दिसू लागतात. कित्येक वर्षांपासून असे कालचक्र सुरूच आहे. संपूर्ण भारतात अशा प्रकारची दोनच ठिकाणे असल्याची माहिती आहे. एक कर्नाटक राज्यात आणि दुसरे महाराष्ट्रात. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील वाळणकोंडी हे देशाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे ठिकाण आहे. वाळणकोंडी तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी आणि रहस्यमय देवमाशांना पाहण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी या निसर्गरम्य ठिकाणी अवश्य भेट द्यावी.
माहिती सेवा गृप पेठवड़गाव ☎@9890875498
Tags
धार्मिक