आळशी लोक जास्त बुद्धिमान असतात

आळशी लोक जास्त बुद्धिमान असतात


दि. ९ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3wDlTtr
जगभरात आळशी लोकांची संख्या काही कमी नाही. अशा लोकांना उठून पाणी घेणे म्हणजे मोठे काम केल्यासारखे वाटते. मात्र,नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात आळस ही बुद्धिमत्तेची निशानी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच स्मार्ट लोक आपलाजास्त वेळ आळस करण्यातच घालवतात.    

आळशी लोक जास्त बुद्धिमान असतात
          

‘हायर आयक्यू’ असणारे लोक सहजपणे कंटाळत नाहीत, याच तत्त्वाला या अमेरिकन शोधाने एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे.‘फ्लोरिडा गल्फ कोस्ट’ येथे करण्यात आलेल्या या संशोधनातील सहभागी विद्यार्थ्यांवर क्लासिक टेस्ट घेण्यात आल्या. 30 विद्यार्थ्यांना थिंकर आणि 30विद्यार्थ्यांना नॉक थिंकर गटात  ठेवण्यात आले. सात दिवसांपर्यंत रिस्ट डिव्हाईसच्या मदतीने त्यांच्या फिजिकल अॅक्टिव्हिटी मोजण्यात आल्या. यामध्ये थिंकर्स गटातील मुले ही नॉन  थिंकर्स विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी अॅक्टिव्हेट होती, असे स्पष्ट झाले.संशोधनात असाही निष्कर्ष काढण्यात आला की, सक्रिय लोक शरीराने जास्त अॅक्टिव्ह असतात. कारण या लोकांना आपला मेंदू एक्स्टर्नल अॅक्टिव्हिटीमध्ये जास्त वापरावा लागतो. दिवसभर काम करून थकणारे लोक नॉन थिंकर्स गटात येतात. मात्र, सोफ्यावर पडून रिमोट दाबत शरीराला न थकवणारे लोक आपल्या जगतात आनंदी राहू शकतात.
नित्कर्ष:: आळशी लोक डोक्यांने रिलॅक्स असतात, ज्याने त्यांना झोपण्यात काहीच अडचण येत नाही. त्यांना झोप चांगली येत असल्याने झोप न येण्याची समस्या आणि त्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही होत नाहीत. याने त्यांच्या शरीराचं इम्यून सिस्टीम चांगलं राहतं
झोप न होणे आणि स्ट्रेस याने खाण्याची इच्छा मारण्यासोबतच पचनक्रियेवरही वाईट प्रभाव पडतो. तेच आळशी लोक प्रॉपर झोप घेतात आणि स्ट्रेसपासून दूर राहतात यामुळे ते या समस्येपासून दूर राहतात.
इमोशनली स्टेबल असल्याकारणाने आळशी लोक रिलेशनशिपमध्येही चांगले राहतात. असं यामुळे होतं कारण आळसामुळे हे लोक नकळत का होईना आपल्या पार्टनरला स्वत:साठी पुरेसा वेळ काढण्याची संधी देतात.
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🔵 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  🔵
______________________________

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম