भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी : पाऊस, पिक परिस्थिती, अनेक गोष्टींवर भाकितं
१ मे २०२५
भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?
भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण १८ प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचं भाकित केलं जातं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचंही भेंडवळच्या भाकिताकडे लक्ष लागलं होतं. अखेर या घटमांडणीचं भाकीत जाहीर झालं आहे.
३५० वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या भेंडवळ येथील चंद्रभान महाराज यांनी ही प्रथा सुरु केली ती आजतागायत त्यांच्या वंशजांनी सुरु ठेवली आहे. त्याकाळी म्हणजे ३५० वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज हे गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया अशा एक महिन्याच्या कालावधीत त्यावेळी असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करुन नंतर त्यावर अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वर्षभराचे शेती, पाऊस, राजकीय, पृथ्वीवरील संकटे या विषयी भाकिते वर्तवत असत. परिसरातील शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असत. सध्या देखील ही परंपरा त्यांचे वंशज चालवत आहेत.
३५० वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या भेंडवळ येथील चंद्रभान महाराज यांनी ही प्रथा सुरु केली ती आजतागायत त्यांच्या वंशजांनी सुरु ठेवली आहे. त्याकाळी म्हणजे ३५० वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज हे गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया अशा एक महिन्याच्या कालावधीत त्यावेळी असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करुन नंतर त्यावर अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वर्षभराचे शेती, पाऊस, राजकीय, पृथ्वीवरील संकटे या विषयी भाकिते वर्तवत असत. परिसरातील शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असत. सध्या देखील ही परंपरा त्यांचे वंशज चालवत आहेत.
भेंडवळ घटमांडणी वर्तविण्यात आलेले अंदाज...
- या वर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील यात गहू, हरबरा, उडीद मुंग, ज्वारी, तूर.
- शेतमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल.
-यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल.
- यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्यआपत्तीचं प्रमाण जास्त असेल
- देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल.
- राजा कायम असेल पण कायम तणावात असेल.
- यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल.
- परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे.
पुंजाजी महाराज यांनी सांगितले की, यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहील, तर पाऊसही सर्वसाधारणच पडेल, परंतु अनिश्चितता जास्त दिसून येईल. भाकितातून देशावर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून, राजकीय तणाव वाढेल, असे संकेत आहेत. तसेच, पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याची भीतीही या भाकितातून व्यक्त करण्यात आली आहे.
यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस हा देखील सर्वसाधारण पातळीवर राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. याचा अर्थ, काही ठिकाणी पिकांना योग्य पाणी मिळेल, तर काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. शेती उत्पादनात स्थिरता राहील, परंतु अपेक्षित वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
9890875498
Tags
माहिती