रायगडावर तिरंगा का फडकवतात

 

रायगडावर तिरंगा का फडकवतात

रायगडावर तिरंगा का फडकावतात       animated-india-flag-image-0004


शिवछत्रपतींचे गडकिल्ल्यांवर फडकणारा तिरंगा राष्ट्रध्वज

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन ओळखले जाते. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा अविभाज्य भाग असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गडकिल्ल्यांची उभारणी करुन शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन केले. रयतेला स्वातंत्र्य आणि लोकशाही मुल्यांची ओळख शिवरायांनी करुन दिली.

रायगडावर तिरंगा का फडकावतात

स्वराज्याचे गडकिल्ले हे त्या काळातील प्रशासकीय केंद्रेच होती. हे गडकिल्ले महाराष्ट्राची ओळख आहेत. ते आपल्या भारताचा राष्ट्रीय वारसा आहेत. गडकिल्ले भ्रमंती करणाऱ्यांखेरीज कुणाचेही त्यांच्याकडे लक्ष नसते ही खेदाची बाब आहे. या गडकिल्ल्यांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती.

गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा जपताना इतिहासातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मान मिळावा दृष्टीने जुलै २०१२ मध्ये तत्कालीन सरकारने शिवरायांच्या गडकोटांवरही राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय समाधानकारक आहे.

जाणुन घेऊया शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरील राष्ट्रध्वज तिरंग्याच्या ध्वजारोहणाबद्दल अपरिचीत गोष्टी…

१) जुलै २०१२ मधील महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र दिन (१ मे) या दिवशी शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर ध्वजारोहण अनिवार्य करण्यात आले आहे.

२) प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) व स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हे राष्ट्रीय सण असल्याने या दिवशी सुद्धा गडकिल्ल्यांवर राष्ट्रध्वज फडकवणे बंधनकारक आहे.

३) गडकिल्ले ज्या प्रशासकीय कार्यालयाच्या प्रदेशात येतात, त्या प्रशासकीय कार्यालयावर सदर गडकिल्ल्यांवर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी असते.

४) ऐतिहासिक गडकिल्ल्यांमध्ये किल्ले रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सीताबर्डी येथे राष्ट्रध्वज उभारावा, असे शासनाचे आदेश आहेत. ते दरवर्षी पाळले जातात.

५) किल्ले रायगड म्हणजे जिथे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची (शिवराज्याभिषेक – ६ जुन १६७४) ज्योत पेटली आणि दिल्लीचा लाल किल्ला म्हणजे जिथे भारताचा स्वातंत्र्यसंग्राम (१५ ऑगस्ट १९४७) संपला, ही या निर्णयामागची पार्श्वभुमी आहे.

६) किल्ले रायगड येथील ध्वजस्तंभ हा त्यामुळेच दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ध्वजस्तंभानंतर देशातील मानाचा दुसरा ध्वजस्तंभ म्हणुन मानला जातो. आपल्याला हा ध्वजस्तंभ रायगड किल्ल्यावरील नगारखान्याच्या समोर पहायला मिळतो.

७) २६ जानेवारी २०१६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किल्ले रायगड येथे महाड तहसिल कार्यालाकडुन फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज हा दिल्लीच्या लाल किल्ला नंतरचा भारतातील दुसरा सर्वात मोठा राष्ट्रध्वज होता. त्याचा आकार “२४ x १६ फुट” असा होता.

८) राज्य शासनाच्या निर्णयानुसार ध्वजारोहणाचा कार्यक्रम सर्व शासकीय कार्यालये आणि गडकिल्ल्यांवर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९:०५ वाजता करण्यात येतो.

९) सर्व गडकिल्ल्यांवरच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना जन-गण-मन हे राष्ट्रगीत वाजविण्यात येते.

१०) गडकिल्ल्यांवर ध्वजारोहण करण्यापुर्वी राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची दक्षता घेण्यात येते. तसेच त्याची रंगीत तालीम घेतली जाते.

११) गडकिल्ल्यांवरील राष्ट्रध्वज सूर्यास्तापुर्वी उतरवला जातो. तसेच राष्ट्रध्वज उतरवण्या आधी वंदे मातरम हे राष्ट्रगाण गायले जाते.

१२) शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज आणि शिवरायांचा भगवा ध्वज एकत्र फडकताना पहायला मिळणं ही खरोखर भाग्याची गोष्ट असते.

गडकिल्ल्यांवरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी अनेक गडकिल्लेप्रेमी, शिवप्रेमी व लोक आवर्जुन उपस्थित राहतात. आपल्यालाही संधी मिळाली तर आपणही या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा.



थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম