शिवसेनेचे जनक -आचार्य अत्रे

शिवसेनेचे जनक - आचार्य अत्रे

 शिवसेनेचे जनक - आचार्य अत्रे

आपणा सर्वांना माहीत आहे की, शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ रोजी केली.आणि 'शिवसेना' हे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवले असे आपण जाणतो. 

पण मुळची शिवसेना ही संकल्पना आचार्य अत्रे यांनी मांडली होती हे आपणास कितपत ठाऊक आहे. 

ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दिवस होते.गुजरात राज्य स्थापन झाले होते व तेथील गुजराती मंडळीचा मुंबई वर डोळा होता.मुंबईवरचा आपला हक्क सोडण्यास मराठी माणूस तयार होत नव्हता.केंद्रात नेहरू सरकार होते.द्वैभाषिक राज्याचे माजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे केंद्रात वजन होते.त्यामुळे एखादा वटहुकूम काढुन वा कायद्याच्या चौकटीतून पळवाट काढून मुंबई गुजरातला दिली तर काय करायचे?? हा प्रश्न मराठी माणसाला अस्वस्थ करून सोडत होता.कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.म्हणुन मराठी माणसांसाठी,महाराष्ट्रासाठी, एक बिगर राजकीय संघटना असावी असे आचार्य अत्रे यांना वाटत होते.फक्त मराठी माणसांच्या भल्यासाठी काम करणारी संघटना असावी. जेणेकरून ती  दबावगट म्हणून काम करेल.

यासाठी अत्रे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या नावाने ती संघटना असावी म्हणुन 'शिवसेना' हे नाव मुक्रर केले. संघटनेसाठी त्यांनी प्रत्यक्षात बैठका घ्यावयास सुरूवात केली.मराठी माणसाची एकी असावी हा त्यांचा ध्यास होता.यासाठी आचार्य अत्रे यांनी आपल्या दै. 'मराठा'त १९ जुलै १९५९ रोजी 'शिवसेना' या नावाचा अग्रलेख लिहिला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते.

शिवसेनेचे जनक आचार्य अत्रे

या अग्रलेख व प्रसिद्धी तारीख पाहता शिवसेनेचे जनक हे बाळासाहेब ठाकरे  हे नसुन आचार्य अत्रे होते असेच म्हणावे लागेल.आचार्य अत्रे हे त्या काळात सभा, बैठका घेऊन आपला मुद्दा मांडत होते पण त्याला मुर्त स्वरूप येत नव्हते. रविवार दिनांक १९ जुलै १९५९.च्या दै मराठा अंकात "आचार्य अत्रे यांची महाराष्ट्राला हांक : ‘शिवसेना’ उभारा" ! नावाचा लेख प्रसिद्ध झाला होता.त्यात ते म्हणतात, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करण्याच्या दृष्टीनें जेव्हां आम्हीं विचार करतों तेव्हां आम्हांला सर्वांत जास्त निकड कशाची वांटत असेल तर ती स्वयंसेवक संघटनेची. संयुक्त महाराष्ट्र समितीजवळ स्वत:चे निराळे असे कार्यकर्ते नाहींत.समितीच्या घटक पक्षांचे जे कार्यकर्ते तेच समितीचे कार्यकर्ते. समितीचा विशेष कार्यक्रम जेव्हां नसेल, तेव्हां हे कार्यकर्ते आपापल्या पक्षांचें कार्य करीत असतात. त्यामुळें संयुक्त महाराष्ट्राचा जनतेंत सतत प्रंचार करणारी अशी एकहि संघटना उपलब्ध नाहीं. किंवा संयुक्त महाराष्ट्राचा आदेश जनतेच्या सर्व थरांत वेळोवेळीं प्रभावी रीतीनें पोंहोचवण्याची अथवा त्याच्या अंमलबजावणीचा सर्व तपशील जनतेला शक्य तितक्या तातडीनें समजावून सांगण्याची कसलीहि व्यवस्था नाहीं. संयुक्त महाराष्ट्राच्या संघटनेमधें ही फार मोठी उणीव आहे असें आम्हांला वाटतें.यासाठी शिवसेना या नावाची संघटना असावी.व ती बिगर राजकीय संघटना म्हणुन काम करेल. बाह्यात्कारी पुष्कळांना असें दिसतें किंवा वाटतें, की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींत शैथिल्य आलेलें आहे, किंवा तिची प्रखरता पूर्वी एवढी प्रज्वलित राहिलेली नाही. पण तो नुसता दृष्टिभ्रम आहे. महाराष्ट्राच्या अंत:करणांतला तो अस्मितेचा नि अभिमानाचा अंगार एकसारखा आंतल्या आंत धुमसतच राहील ह्याबद्दल तिळमात्र कोणीहि शंका घेऊं नये. वेळ आली म्हणजे, त्या अंगाराच्या ज्वाळा अशा रौद्र स्वरूपांत प्रकट होतील कीं त्याच्या नुसत्या धगीनें शत्रूंची सालटी न् सालटी जळून त्यांचा कोळसा होईल.असे अत्र्यांनी आपल्या लेखात मत मांडले होते. 

यावरून असे म्हणता येते की, शिवसेनेचे जनक हे आचार्य प्र.के. अत्रे हेच होते. शिवसेना हे नाव प्रथमत: आचार्य अत्रे यांनीच वापरलं होतं व ते अशी संघटना निर्माण करण्याच्या प्रयत्नात देखील होते हे दिसुन येते. 

नंतर म्हणजे अत्रे यांनी लेख लिहिल्यानंतर सुमारे सात वर्षानंतर १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आत्ताची जी शिवसेना आहे तिची स्थापना केली. 










थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম