शिंग्रूबा धनगर व खंडाळा घाट

शिंग्रूबा धनगर व खंडाळा घाट  



फेसबुक लिंक https://bit.ly/2RINTsE
        मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता.ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता सह्याद्रीच्या घाटातून करण्याचा निर्णय घेतला,तेव्हा“रस्ता’कसा,कोठे तयार करायचा रेल्वेचे रूळ कोठल्या भागात टाकायचे हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा धनगर शिंग्रुबा.शिंग्रुबा वर्षानुवर्षे या घाटाच्या कुशीत, डोंगर माथ्यावर,डोंगर-कपारीत आपली मेढरं चरायला नेत असे

शिंग्रूबा धनगर व खंडाळा घाट

त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती.ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून,सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला,बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले.म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते. यावर एका ब्रिटिश आधिकारयाने तुला बक्षिस म्हणुन काय पाहिजे असे विचारले असता शिंगरूबाने मला काही नको पण या देशाला स्वातंत्र्य दया असे म्हणाला, याचा राग येऊन  निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकाऱ्यांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले. ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात,शिंग्रुबाचे स्मरणार्थ छोटेसे देऊळ बांधले प्रत्येक ड्रायव्हर,प्रवासी क्षणभर थांबवून,शिंग्रुबाला वंदन करूनच,पुढे जातो.जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमरनी मराठी भाषेत धनगरांच्या मौखिक वाङ्मयाचे छापील ग्रंथ जतन करण्याचे महान कार्य केले आहे. 

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম