किल्ले वारुगड

 किल्ले वारुगड 

माण खोर्यात माणगंगा नदी ज्या डोंगरात उगम पावते तो सीताबाईच्या डोंगर म्हणुन आोळखला जातो. तेथे डाव्या कुशीवर एक किल्ला आहे. त्याचे नाव आहे वारुगड किल्ला. 

किल्ले वारुगड
माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर हा किल्ला आहे.

किल्याचा इतिहास

  दिल्लीचे मुघल,व  विजापूरचे आदिलशाही स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या माण  परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे गड उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारूगडाचे ठाणे राजांनी जिंकले असे सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या . शिवकाळात या किल्ल्याचा किल्लेदार प्रभू जातीचा होता.३०० पहारेकरी व बरीच शिबंदी गडावर होती.१८१८ मध्ये सातारच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुस-या बाजीरावाकडून हा किल्ला घेतला. 

 पहाण्यासारखी ठिकाणे 

वारूगड किल्ल्याचे दोन भाग पडतात.एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.

१. वारुगड माची

किल्ला फिरत असताना किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे.किल्ल्याची माची ही संपूर्ण भक्कम  तटबंदीने बंदिस्त आहे.आजच्या काळातही ती ब-याच मोठा प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो.या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते.इंग्रजानी केलेल्या हल्यात तीन दरवाजे उद्ध्वस्त झाले मात्र  आज दोनच शिल्लक आहे. गडाखाली असणाऱ्या गिरवी जाधववाडी या मार्गे माचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते.तर मोंगळ -घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुस-या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे,वाड्याचे विखुरलेले अनेक अवशेष आहेत.दोन ते तीन पाण्याची टाकी,तळी सुध्दा आहेत.माचीवर गडाचे दैवत भैरोबाचे जीर्णोध्दार केलेले मंदिर आहे. हे मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. गडाची संपूर्ण माची फिरण्यास दोन तास पुरेसे आहेत.

२. बालेकिल्ला

गडाखाली असणाऱ्या       गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागला जातो.एक उजवीकडे आणि दुसरा  डावीकडे जाणरा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट  बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी  जाते.दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे.बालेकिल्यावर पोहचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे.आजच्या काळात ती पूर्णपणे नव्याने बांधलेली आहे समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे.विहीर ब-याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून सभेवार नजर टाकली असता समजते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे.समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर, व महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो. जवळच असणाऱ्या संतोषगडावरून सीताबाईच्या डोंगरातून एक  नागमोडी वळणाची वाट वारुगडावर येते.

गडावर जाण्याच्या वाटा

             शिवकालीन वारुगडावर जायचे असल्यास फलटणला जावे.फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड हा  मुख्यतः दोन भागामध्ये विभागला आहे.एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतूच जावे लागते.माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.यापैकी कोणताही मार्ग अवलंबावा. 

१. फलटण ते गिरवी

           फलटण ते गिरवी अशी एस.टी.सेवा व खाजगी वहाने उपलब्ध आहेत.गिरवीतून ६ किमी अंतरावर असणारा जाधववाडीत जावे.जाधववाडी हे किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव आहे.येथून वारुगड माचीवर जाण्यास  किमान २ तास लागतात.माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरेसे आहेत.

२. फलटण दहीवडी 

 फलटणपासुन  दहीवडी रस्त्यावर २० किमी अंतरावर मोंगळ नावचा एक फाटा आहे.या फाटयापासून एक गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो.मोंगळ ते घोडेवाडी अंतर १२ कि.मी चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २५ किमी अंतरावर बीजवाडी नावचे गाव लागते.या गावातून एक गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो.शिवकाळात हा किल्ला कसा असावा याचा अदमास बांधायचा असेल तर एकवेळ हा माण खोर्यातील किल्ला जरूर पहावा. 


▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম