शंभुसिंह जाधव

 शभुंसिंह सुजनसिंह जाधव 
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
_________________________
पावनखिंडीत शहीद झालेल्या शुरवीर  श्रीमंत शंभुसिंह सुज़नसिंह  जाधवराव याच्या कार्याचा आढ़ावा
फेसबुक लिंक http://bit.ly/2S1kL3w
श॑भुसिंह जाधवराव हे श्रीमंत लखुजी राजेज़ाधव याचे पणतु आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव याचे वडील होते
त्याचे वडील सुजनसिंह आणि  श्रीमंत शहाजी राजेभोसले आणि जिज़ाऊचे जेष्ठ पुत्र श्रीमंत संभाज़ीराजे कर्नाटकातीलं कनकगिरी येथे  १६५३ ला सरदाऱ आपाखान याच्या बरोबर तुबळ युद्धात हें दोघे श्रीमंत लखुज़ीराजेचे दोन नातु शहिद झाले
सुज़नसिंह कर्नाटक मोहिमेवर असताना त्यांच्या पत्नी आणि मुलगा शंभुसिंह हे राजामाता जिज़ाऊ जवळ राहत होते.
शंभुसिंह हे छत्रपती शिवाजीमहाराज याचे बालमित्र होते. या दोघानाही शिक्षण राजमाता जिजाऊच्या हाताखाली मिळत होते
छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर ते प्रत्येक कार्यात बरोबर असत.
छत्रपती शंभुसिंह  इतर मावळ्यासोबत  रायरेश्वराच्या मंदीरात  स्वराज्याची शपथ घेतली.
ते प्रतापगडच्या पायथ्याशी  अफज़ल खान वधावेळी सुद्धा ते महाराजासोबत अंगरक्षक म्हणुन सुध्दा  होते
१६६० ला छत्रपती शिवाजीमहाराज आणि शंभुसिंह जाधवराव जेथे राहत होते त्या पन्हाळा किल्यास सिद्धी जोहर याने वेढा दिला .त्यामुळे किल्यावरचे दळणवळण बंद झाले ,तेव्हा छत्रपती शिवाजीमहाराज याने किल्ला स्वाधीन करतो असा निरोप दिला,त्यामुळे शत्रुचे सैन्य बेसावध राहिले. छत्रपती शिवाजींवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी हुबेहूब छत्रपती शिवाजीराजेंसारखे  दिसणारे शिवा काशीद  त्यांना पोशाख घालुन शत्रुची दिशाभुल करण्यासाठी पाठविले .
पण सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वीर  शिवा काशीदांला ,छत्रपती शिवाजी समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र, हे  छत्रपती शिवाजी नाही असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खुपसली
त्या पौर्णिमेच्या मध्यरात्री छत्रपती, शंभुसिंह ,बाज़ी बांदल,बाज़ीप्रभु,  आणि  बादल सेना  आपल्या निवडक मावळ्याना सोबत घेऊन शत्रूच्या पहार्याच्या चोक्या चुकवत खाली उतरून थेट खेळणा किल्याकडे प्रयाण केले. ज्यावेळी सिद्धीच्या सैन्याला समजले मग सिद्धी जोहरचा मुलगा शिद्धी उजीज़ ह्या सैन्य घेऊन पाठलाग सुरू केला .त्यावेळी महाराज खेळणा किल्याचां घाट चढत होते शत्रु सैन्य पाठलाग करीत आहे हे समजल्यावर छत्रपती ने बाज़ीप्रभु देशपांडे शंभुसिंह जाधवराव , बाजी  बांदल आणि त्यांची सेना आणि इतर मावळे खिंडीत थांबविले आपण किल्यावर सुखरूप पोहचल्याचा तोफेचा आवाज आवाज एैकूर येई पर्यंत शत्रुला थोपुन धरावे असे सांगितले
खिंडीत शत्रुचे १५००० सैन्य आणि महाराजाचे ३०० सैन्य याच्यात घनघोर युद्ध  झाले यामध्ये शंभुसिंह बाजी  बांदल,  बांदल सेना  शहिद झालें,एक गोळी बाजीप्रभुना लागली महाराज गडावर पोचले  तोफेचा आवाज आला आणि बाजीप्रभुचा  प्राण समाधानाने गेला
अश्या या शुरविरशुरविराला  विनम्र अभिवादन

शभुंसिंह सुजनसिंह जाधव

थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম