कुठे गेले ते दिन

अनेक वर्षात खाल्लेली नाही...
जत्रेत मिळणारी ..
पत्र्याची शिट्टी ..
वाजवलेली नाही.

चटक्यांच्या बिया घासून ..
चटके द्यावेत ..
असं आता वाटत नाही...
कॅलिडोस्कोप ..क्रित्येक वर्षात

सर्कसमधला जोकर आपलं ...
मन आता रिझवू शकत नाही.
तसंच कापसाची म्हातारी ..
पकडण्याचा चार्मही ..
आता राहिलेला नाही..
कारण ..

हे सगळे आनंद नेले...
त्याच्या बदली ..
तिचं वार्धक्य तिने ..
आपल्याला दिलं...
कापसाच्या म्हातारीने ..
उडता उडता आपला ..
बालपणीचा काळ सुखाचा.. स्वत:बरोबर कधी नेला ..
ते आपल्याला कळलंच नाही.म्हणूनच ती अजून उडू शकते...

कुठे गेले ते दिन

जोड्या करून ..
चालणं नाही..
विटी दांडू नाही...
साबणाचे फुगे नाहीत..
प्रवासात बोगदा आला तर ..
एक अनामिक हुरहूर नाही..
लाटेने की काळाने ...
नेला तो किनाऱ्यावरचा वाळूचा किल्ला?
भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…
हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….
गेले कुठे ते चालताना ..
पॅकपॅक” आवाज करणारे ..
पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट”
म्हणत आवळलेली ती ..घट्ट मूठ….
किती जिव्हाळा होता ..
डोकं टेकवलेल्या ..
आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त ..
ऊब होती त्या ..
मायेच्या कुशीत…
हरवला तो प्रेमाचा घास….
“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…

घरात न सांगता ..लपवून लपवून ..भेळ खायचा तो ..
प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते ..
गोड गोड म्हातारीचे केस?

छोट्याशा बुटांची ..
आईने बांधलेली ती ..
सुटलेली लेस….
गेली कुठे ती ..
मामाच्या गावी जाणारी ..
झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती ..
गण गुट्यांची ..
जोडलेली बैल गाडी?
धावत धावत ज्याचा ...
पाठलाग केला ..
तो धूरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबडगीते गाताना ..
एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला
झोपताना पाहिलेला तो ..
चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई ..
पाटीवर लिहिणारा तो ..
खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे ...
आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण..
खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?
आयुष्यातील काही ...
अनमोल क्षणांची आठवण ...
ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते...
पण बालपणीच्या काही ..आठवणी,
मनाच्या कोपऱ्यात ..
अजूनही दाटलेल्या असतात,
त्यांना हलकेच गोंजारलं असता ..
त्यांची सय अधिकच गडद होते...
आपलं मनही किती विचित्र असतं ना...
जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं...
शाळा सोडून बाबांसारखं ...
ऑफिसला जावंसं वाटतं तर दादासारखं कॉलेजला जावंस वाटतं.
 मात्र आता मोठं झाल्यावर ...
पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..
आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..
कोई लौटा दे मुझे...
बीते हुए दिन..


थोडे नवीन जरा जुने

যোগাযোগ ফর্ম